बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

वाढदिवस !

का मित्राचा वाढदिवस विसरलो म्हणून सहजच गेला महिना पडताळून पहिला आणि लक्षात आलं कि गेल्या महिन्यात तीन वाढदिवस होऊन गेले . 

पहिला वाढदिवस आपल्या सर्वांच्या नित्य वापरातल्या "गुगल" चा . यांत्रिक गोष्टीचा वाढदिवस साजरा झाला. . जगभरात 'गुगल'चा  वाढदिवस मोठ्या दिमाखात वेगवेगळ्या पद्धतीने जरा केला गेला . 

दुसरा वाढदिवस म्हटलं तर फार मोठा आणि म्हटलं तर . . . . 
असो, आपल्या देशाचे लाडके (?) पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांचा वाढदिवस हि झाला . 

गल्लीबोळातल्या नेत्यांच्या वाढदिवसाला शेकडो फ्लेक्स लावून शहर बकाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपला सर्वोच्च नेता आणि त्यांच्या वाढदिवसाचाही सोयीस्कर विसर पडावा , हि खूप मजेशीर अशी बाब आहे. 
पण आपल्या या सर्वोच्च नेत्याला  दिल्ली दरबारी  दिल्या जाणाऱ्या  वागणूकीचाच कित्ता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी,स्थानिक नेत्यांनी  गिरवल्याचे दिसले . निदान या एका बाबतीत तरी दिल्ली पासून गल्ली पर्यंत 'एकात्मतेचे' अभिनव दर्शन देशाला या निमित्ताने घडले . 

तिसरा वाढदिवस - २ ८ सप्टेंबर ! या दिवसाचं महात्म्य खूप मोठ … 
ज्वलंत आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या अशा एका महान क्रांतिकारकाचा जन्मदिवस . 

शहिद  भगत सिंग- नुसत नाव घेतलं तरी त सळसळून उठत आणि छाती अभिमानाने भरून येते . 
   
महिन्याच्या पहिल्या तारखेची आतुरतेने वाट बघणारा या देशातला युवा वर्ग गेल्या महिन्यात मात्र भारतमातेच्या चरणावर आपलें  प्राण अर्पण करणाऱ्या या थोर देशभक्ताला विसरला होता . 

त्यामुळे शहिद भगत सिंगांच्या जन्मदिनी मला प्रकर्षाने 'गुलाल' या हिंदी चित्रपटातले एक विडंबन गीत आठवले . . . 

" आज का लौंडा ये केहता . .  हम तो बिस्मिल थक गये  !

  अपनी आझादी तो भय्या , लौंडिया कि दिल में हैं .. 

  सरफरोशी की तमन्ना अब ना  किसी के दिल में हैं  !!! "  

भारतमातेच्या स्वतंत्रतेकरिता आपल्या  प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकाच्या वाटेला हि उपेक्षा यावी. . यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं ? 
पण नेत्यांचे ,नट-नट्यांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या नव्हे तर त्यांची मंदिरे उभारणाऱ्या समाजाकडून काय अपेक्षा करावी ?

या तीन ही वाढदिवसात एक साधर्म्य मात्र नक्कीच आहे. 
गुगल ' या शोध यंत्राचा 'यंत्रवत' वाढदिवस . देशाच्या सर्वोच्च (?) नेत्याला 'यंत्रवत' असल्याची जाणीव करून देणारा वाढदिवस आणि बधिर झालेल्या समाजमनाने 'यंत्रवत'पणे "न" साजरा केलेला एका अन क्रांतिकारकाचा वाढदिवस !

नट नट्या- सिनेतारकांच्या वाढदिवसाला त्यांच्या कारकीर्दीचं भरभरून वर्णन करणाऱ्या इलेक्ट्रोनिक मिडियालाही या तीनही वाढदिवसात टीआरपी नसल्याने फारसं लक्ष द्यावसं वाटलं नाही . 

शहिद भगतसिंगांच्या  जयंती समारोहाच्या एखाद  दुसऱ्या कोपऱ्यात झालेल्या कार्यक्रमापेक्षा "  ग्रांड मस्ती " ला आजचा युवक तुडूंब गर्दी करत होता . 

'शोकांतिका' हा शब्दही थिटा पडावा , अशीहि आजची विदारक परिस्थिती  आहे.

आज जर रामप्रसाद बिस्मिल हयात असते तर त्यांनी शहीद भगतसिंगांना नक्की विचारलं असतं कि "ते" कोणतं स्वप्न होतं 'भगत ' जे तू  या देशासाठी इथल्या लोकांसाठी पाहिलं होतस ?

ज्या स्वराज्यासाठी तू लढलास . . त्याचं आजचं हे भीषण वास्तव बघण्यासाठी तू थांबायला हव होतसं भगत !

मित्रानों , आज तर काही लोक यापेक्षा इंग्रजाचं राज्य बरं होतं असे म्हणू लागले आहेत . 
काय वाटत असेल हे ऐकून भगतसिंगांच्या  आत्म्याला . . . 

खादीचे कपडे परिधान केलेल्या राजकीय नेत्यांना गांधीजींच्या फोटो असलेल्या नोटांचे घातले जाणारे हार . . 
इंग्रजांच्या क्रिकेट मध्ये उद्योगपतींनी पैसे लावून  घेतलेल्या कोंबड्यांच्या झुंजी …. 
मस्तवाल धनिकांच्या व नट नट्यांच्या बेफाम गाडीखाली चिरडले मरणारे  निष्पाप जीव ….
कॅश -करप्शन-क्रिमिनल या "सी " कल्चरने व्यापून गेलेलं राजकारण . . . . . 
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं सरकार . . . . 
माता -भागिनींवर राजधानीतच होणारे पाशवी बलात्कार . . . . 
गुंडांना समाजात मिळणारी प्रतिष्ठा .. 
मूल्यांच अध:पतन आणि नैतिकतेचा झालेला ऱ्हास . . . 

. . आणि हे सारं काही टी.व्ही वर "एन्टरटेनमेंट "म्हणून बघणारा या देशाचा तटस्थ नागरिक  .  .   . 

खरच, हे सगळं पहायला आज भगतसिंग हवे होते का ? 

क्रांतिकारकांच्या असीम त्यागापेक्षा नट नट्यांच्या ,सिनेतारकांच्या अनैतिक संबंधानाच जिथे बहुचर्चित प्रतिष्ठा आहे . 
जिथं गुंड हे समाजसेवक आहेत ,त्यांना समाजात मोठा मान आहे. जिथं विनासायास आणि फुकट मिळालेली गोष्ट म्हणजे "स्वातंत्र्य" आहे . 
अशा समाजातून राष्ट्रप्रेमाने भारावलेली नवीन पिढी आपण कशी निर्माण करणार आहोत ? 

सुखासाठी ' स्वातंत्र्याचे ' व आरामासाठी ' आझादीचे ' दान करू पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. 
पाश्चिमात्यांच्या 'भोग ' संस्कृतीची पकड कायम आहे . 
गोरे गेले . . . . काळे आले ! 
परंतू इंग्रजांची प्रवृत्ती कायमच आहे . . . . म्हणूनच "चलेजाव " किंवा "करेंगे या मरेंगे " हे आंदोलन आजही संपलेले नाही . 

मित्रांनो , ज्या नरदुर्गांनी आपल्या सर्वस्वाची होळी करून आपल्या प्राणांची आहूती दिली . त्यांचीच स्वप्नं आज पायदळी तुडवली जातायत  .  . 

हे स्वातंत्र्य , हि हुतात्म्यांची स्वप्नं घट्ट धरून ठेवावीत आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपल्या परीनं झटाव असं कुणालाच कसं वाटत नाही ?

पगाराच्या तारखेची वाट बघत जगणारे आम्ही,  'ज्यांच्यामुळे ' आजचा हा दिवस बघतो आहोत त्यांची साधी जन्मतारीख सुद्धा लक्षात ठेवू शकत नाही . त्याचं बलिदान ,त्यांचा असीम त्याग  आमच्या लक्षात राहत नाही . 

कारण , आम्ही " भागांवाला "नाही आहोत ! 

आम्ही या  देशाचे सर्वात करंटे  आणि नालायक सुपूत्र आहोत .  .  . 







टीप  : - ( " भागांवाला "- सौभाग्यशाली - शहिद भगतसिंग यांचे लहानपणीचे नाव .) 

1 टिप्पणी:

  1. Sujeet Dada :- hats of to u ( _/\_ )
    aaj kal lokana fakt...31dec, gatari etc aathvan aste, pan jyanchya mule deshala khare swatantr bhetle lok tyana visartat....
    netyanchya vadhdivasala ghar ghalun dandhe karnare hi mandali ashya veles kuthe gele le astat kay mahit ?
    ya deshat kharach avghad aahe, pudhchya pidhi tar kay kartil, kalpanahi karu shakat nahi...aso !
    -
    Vande Mataram
    -
    Manoj Kokate

    उत्तर द्याहटवा